‌‌अ‌मली तस्करांच्या शोधार्थ

रायगड किनारी गस्त


| अलिबाग | प्रतिनिधी |

रत्नागिरी जिल्ह्यातील काही समुद्र किनारी चरसचा साठा आढळून आला. या घटनेनंतर रायगड पोलीस दल देखील सर्तक झाले असून, जिल्ह्याच्या सागरी किनारी पोलिसांची गस्त वाढवण्यांत आली आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीसह काही समुद्र किनारी 200 किलोपेक्षा अधिक चरसचा साठा वारस स्थितीत पोलिसांना आढळून आला . या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी पोलीसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यांत आला आहे. पोलिसांनी किनारी भागातील ‌मच्छि‌मारांशीही संपर्क साधत खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत .तसेच काही संशयास्पद आढळल्यास तातडीने पोलीस यंत्रणेशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Exit mobile version