।पुणे । वृत्तसंस्था ।
सी.एन.जी च्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची नुकतीच भाडेवाढ केली आहे. त्यानुसार रिक्षा चालकांना आता पहिल्या दीड की.मी. साठी 4 रुपये तर त्या पुढील प्रति एक किमीसाठी 3 रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सध्या पुणे जिल्हा भागाला लागू होणार आहे.
रिक्षाचालक पूर्वी पहिल्या टप्प्यातील दीड किमीसाठी 21 रुपये भाडेदर आकारणी करत होते. आता रिक्षा चालकांना 25 रुपये भाडे आकारता येणार आहे. तर पूर्वी दीड किमीच्या अंतरापुढील एक किमीसाठी 14 रूपये भाडे दर आकारणे बंधनकारक होते. आता 17 रुपये आकारणे बंधनकारक राहणार आहे. ही नवी भाडे वाढ १ सप्टेंबर पासून लागू करण्यात येणार आहेत .