। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताने ब्रिटनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या कोविड -19 लसीला मान्यता न दिल्याने आता भारतानेही ब्रिटनविरुद्ध सूड उगवला आहे. भारत सरकारने शुक्रवारी जाहीर केले की 4 ऑक्टोबरपासून ब्रिटनमधून भारतात येणार्या सर्व प्रवाशांना भारतात 10 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल. याशिवाय, ब्रिटनहून येणार्या सर्व प्रवाशांच्या कोरोना तपासणीसाठी विमानतळावर आरटी-पीसीआर चाचण्याही केल्या जातील. याशिवाय, ब्रिटिश नागरिकांना भारतात आल्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा आरटी-पीसीआर करावी लागेल.