आ जयंत पाटील यांची मागणी
। मुंबई । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खारलँडमध्ये ८ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, याची एसआयटी मार्फत चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आम. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली. सभागृहात मंगळवारी पूरक मागणी वर चर्चा करताना जयंत पाटील यांनी खारलॅन्डच्या कारभारावर जोरदार टीका केली. खारलॅन्डमुळे अलिबाग तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यासाठी खारभूमीच्या विकासासाठी निधी दिला जावा अशी मागणी आम्ही सातत्याने करीत आहोत. दुर्दैवाने जो निधी आला त्यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणीही आ जयंत पाटील यांनी केली आहे.