सोळा वर्षानंतरही शेतकर्यांचे
हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच
| माणगाव | सलिम शेख |
सोळा वर्षानंतरही कोेकणच्या आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे काम रखडल्याने या भागातील शेतकर्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. शासनाच्या गलथानपणामुळे व कोकण विकासाच्या.आकसामुळे कुंभे जलविद्युत प्रकल्पाचे पुनवर्सन भूसंपादन वनजमिनी हस्तांतरणाचा कामे वगळता उर्वरित सर्व भागाची बांधकामे मे 2015 पासून च्या पत्रान्वये काळ व कुंंभे जलविद्युत प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रषासकीय मान्यताप्रत खर्चापेक्षा जास्त झाल्याची सबब सांगून स्थापत्य कामावर कोणताही खर्च करणेत येउ नयेत असे शासनाने निर्देेेष असल्यामुळे कुंभे प्र्रकल्पाचे काम बंद पडले आहे. यामुळे या प्रकल्पाचा एकत्रित खर्च प्रशासकीय मान्यताप्राप्त खर्चापेक्षा जास्त झाल्यामुळे प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याषिवाय व शासनाने नविन बांधकाम सुरू करणेचे आदेष दिल्याषिवाय काम सुरू होणार नाही असे चित्र आता दिसत आहे. काळात अनेक सरकार होऊन गेले. मा़त्र शासनाने गांभीर्याने या प्रकल्पाकडे पाहिलेले नाही. त्यामुळे माणगाव व महाड तालुका विकासापासून दूर फेकला गेला.
अंतुलेंच्या स्वप्नांचा भंग
माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत या बहुउद्देषीय प्रकल्पाची योजना माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए.आर. अंतुले यांची होती. या प्रकल्पामुळे वषर्र्भर नागरिकांच्या वीज व पाणी या मुलभूत गरजांचे निराकरण हमखास होईल. व कृषी व उद्योगाला विषेश चालना मिळून मागासलेल्या कोकणचा विकास होईल अशी या मागची संकल्पना होती. परंतु त्यांच्या अल्प कारकिर्दीमुळे ही योजना मागे पडली.
कुंभे जलविद्युत प्रकल्पाला 15 ऑक्टोंबर 1998 मध्ये सुमारे 100 कोटी रूपयाची मान्यता मिळाली. व तेथे जाण्यायेण्याच्या रस्त्यासाठी बोगदयासाठी 11 एप्रिल 2002 साली वनविभाागची मान्यता मिळाली. पुढे कार्यकारी अभियंता नि.रे. कारीमुंगी व त्यांच्या सहकार्यांनी हा प्रकल्प फायदेशीर होण्यासाठी काळ आणि कुंभे एकत्र केले.
भविष्याातील विजेची वाढती मागणी व तुटवडा लक्षात घेऊन विज निर्मिती बरोबर सिंचन क्षेत्रासाठी व औद्योगिक वसाहतीत पाणी उपलब्ध होईल असा महत्वाकांक्षी प्रकल्प तयार केला. 17 नोव्हेंबर 2006 पासून कुंभे धरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली. बोगदा खणून प्रकल्पा पर्यंत जाण्याचा रस्ता तयार करण्यात आला उन्हाळयामध्ये कोकणांत अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई, वारंवार वीज खंडीत होणे व यामुळे शेती व उदयोगांची कामे थांबणे म्हणजे विकास कामांना खिळ बसणे हे कोकणवासीयांचे पूर्वापार दुःख आहे. पावसाळयात धुव्वाधार पाउस पडतो. व सर्व पाणी समुद्रास जाउन मिळते. पण हेच सहयाद्रीच्या कुषीत पडणारे पावसाचे पाणी कुंभे सारख्या डोंगरात अडविले तर प्रदुशण विरहीत जलविद्युत प्रकल्पामुळे वर्षभर नियमित कृशि व उद्योगाला वीज व पाणी मिळेल हे बॅ. अंतुले यांचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार कधी होणार? हा प्रश्नच नागरिकांना प्रदीर्घ कालावधी नंतरही भेडसावत आहे.
तृतीय सुधारित प्रशासकीय कुंभे जलविद्युत प्रकल्पासाठी 252 कोटी 37 लाख 51 हजार रूपये खर्चाची प्रशासकीय मंजुरी 6 जानेवारी 2011 रोजी मिळून प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली होती. 15 नोव्हेंबर 2017 पर्यंत 200 कोटी 12 लाख 37 हजार रूपये खर्च होऊन धरणाचे काम 70 टक्के, सारिका विमोचन 75 टक्के, सांडवा 90 टकके, जलवहन प्रणाली खोदकाम 91 टक्के, विद्युतगृह 10 टक्के इतके काम झाले आहे. कुंभे येथे धरणालगत 118 कुटूंबाना प्लॉट दिले. तर उर्वरित कुटूंबाचे भादाव येथे पुनर्वसन अर्धवट स्थितीत करण्यात आले.