केपीएल ठरला लालबाग रॉयल्सचा मानकरी
। पेण । प्रतिनिधी ।
पेण येथील क्रीडा संकुलावर झालेल्या10 व्या केपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत लालबाग रॉयल्सने अर्णव वॉरियर्सचा 1चेंडू आणि 6गडी राखून शानदार विजय मिळवून केपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.
यास्पर्धेचा बक्षीस समारंभ माजी उपनगराध्यक्ष रघुनाथ बोरकर यांच्या हस्ते झाला .यावेळी व्यासपीठावर आकाश ठाकूर, विजय धामणे, गोपाळ गोडिवले, हरिभाऊ पेळणेकर, सुरेश पाटील, बाळा कोंडेकर, मनोज पवार, जितेंद्र शाह, छाया शिंदेआदी मान्यवर उपस्थित होते.
गेले दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेत उपांत्यफेरीच्या लढतीत अर्णव वॉरियर्सने मुंजोबा भैरीदेवी इलेव्हन्सचा पराभव केला. लालबाग रॉयल्सने याआधीच अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. गेली 10 वर्षे केपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षी राहुल बोरकर यांच्या नेतृत्वाखाली यास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या समालोचनाची जबाबदारी महेश गोडिवले, गणेश चव्हाण, संदीप साळवी यांनी पार पाडली. स्पर्धेचा मालिकावीर अर्णव वॉरियर्सचा विशाल कोंडेकर, स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून संचित चाळके, आणि उत्कृष्ट गोलंदाज ऋषी निकम ठरला अनुक्रमे लालबाग रॉयल्स, अर्णव वॉरियर्स,मुंजोबा भैरीदेवी एलेव्हन्स, कल्पेश जॅग्वार आणि जयमल्हार असे अंतिम पाच संघ होते.