| माणगाव । वार्ताहर ।
रायगड ही छत्रपती शिवरायांची व महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकरांचे ऐतिहासिक भूमी आहे. या जिल्ह्यात अनेक स्वातंत्रपूर्व काळात ब्रिटीश सरकारशी झालेल्या लढ्यांचा इतिहास आज ही साक्ष देतो. या जिल्ह्यात लढ्याची परंपरा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावा गावातील तरुण तरुणी आज ही मोठ्या प्रमाणात सैन्य दलात विविध पदावर व उच्चस्थानी महत्वाची जबाबदारी सांभाळत देशाचे संरक्षण करीत आहेत. त्यातील कांही तरुण सैनिकांना देशाचे संरक्षण करताना देशांच्या सिमेवर वीरमरण आले. तसेच अनेक सैनिक आजी माजी आहेत. त्यांच्या पाल्यांना केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यात मिल्ट्री (सैनिकी) स्कूल उभारून सीबीएससी पॅटर्न शिक्षण द्यावे. यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष पंकज तांबे यांनी भारत सरकार केंद्रीय संरक्षण मंत्री रामनाथ सिंह यांना नवी दिल्ली येथील कार्यालयात पोस्टाने निवेदन देवून लक्ष वेधले आहे.
जिल्ह्यातील कांही तरुण सैनिक देशांच्या सिमेवर सरक्षण करतांना अनेकांना वीरमरण पत्करावे लागले. तसेच आजही सैन्यामध्ये सिमेवर लढत असणार्या सैनिकांच्या त्याचबरोबर माजी सैनिकांच्या मुलांच्या-मुलींच्या शिक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड जिल्ह्याला लढ्याचा इतिहास आहे. याठिकाणी सर्व सोयींनीयुक्त उच्च दर्जाचे सीबीएससी पॅटर्न शिक्षण देण्यासाठी सैनिकी स्कूलची गरज आहे. या जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षण मिळाल्यास देशाच्या उन्नतीत भर पडेल. अशी आशा व्यक्त केली आहे.