शेकापच्या राज्य चिटणीस मंडळ सदस्य पदी मोहन गुंड

| बीड | प्रतिनिधी |

पंढरपूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात शेतकरी कामगाराच्या प्रश्नावर सातत्याने लाल झेंडा घेऊन आवाज उठवणारे, प्रचंड जनसंपर्क असणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम कराणारा चेहरा म्हणून ओळखले जाते. केजचे भूमीपुत्र भाई मोहन गुंड यांची सर्वानुमते निवड झाल्यामुळे प्रमाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. भाई मोहन गुंड हे जवळपास 2004 पासुन पक्षात सक्रिय आहेत, त्यांनी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांवर सतत आवाज उठवत आसतात. शेतकर्यांचे अनेक प्रश्न तडीस लावले आहेत, भाईंच्या निवडी मुळे मराठवाड्यातील शेतकर्यांना एक लढवय्या युवा नेता मिळाला आहे.

राज्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अदिवाशी इतर सर्व समावावेशक अनेक ठराव घेण्यात आले, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ व मध्यवर्ती समिती सदस्यांच्या निवडी ही करण्यात आल्या. पक्षाचे सरचिटणीस म्हणून पुन्हा भाई जयंत पाटील निवड झाली आहे. शेतकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वीस वर्षांपासून सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून संघर्ष करणाऱ्या केजचे भूमिपुत्र भाई मोहन गुंड यांची राज्य चिटणीस मंडळात नव्याने संधी मिळाली आहे, यामुळे सर्व पक्षातील तळागाळातील कार्यकर्ते पक्षाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Exit mobile version