। नागपूर । दिलीप जाधव ।
अलिबाग तालुक्यातील वेश्वी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडणूक अधिकार्याला मारणार्या गुंड मयूरेश गंभीर याला तातडीने मोक्का कायद्याअंतर्गत अटक करा, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि.30) विधान परिषदेत करुन सरकारचे लक्ष वेधले.
ते पुढे म्हणाले की, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना तक्रार दिली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत या गुंडाने मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील ग्रामस्थांनी त्याच्या दादागिरीला भिक घातली नाही, असे सुद्धा त्यांनी ठासून सांगितले.
या गुंडावर कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याच्या आरोपामुळे तसेच हिंसात्मक कारवाया केल्यामुळे त्याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान 307 आणि इतर कलमानुसार पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्या गुंडाची गुन्हेगारी पाश्वर्र्भूमी लक्षात घेऊन त्याच्या विरुद्ध मोक्का कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.