रिफायनरी कोकणात नकोच- राज ठाकरे

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर रविवारी रत्नागिरीत येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. मात्र, राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट म्हटले.

एक दोन प्रकल्प महाराष्ट्रातून दूर गेले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. कोकणातल्या जमिनी विकत घ्यायला भुरटे येतात. त्यावेळी खरबदारी घ्यायला हवी, एक गठ्ठा हजारो एकर जमीन जातेय बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा संशय येत नाही का, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. मतदानातून कोकणी जनतेने राग व्यक्त करायला हवा. मात्र, तो होत नसल्याचे ही राज यांनी म्हटले.

मनसेला संधी
कोकणात मनसेसाठी सकारात्मक वातावरण असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. कोकणातील पक्ष संघटना आगामी काळात मजबूत होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. जानेवारीत कोकणात दोन सभा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. एक सभा कुडाळ आणि दुसरी सभा चिपळूण किंवा रत्नागिरी येथे होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Exit mobile version