। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पनवेल शहर जिल्हा काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारचा व राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. सध्या संपूर्ण देशभरात महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना व जीवनाश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जी.एस.टी मुळे सामान्य माणूस काय करेल, याकडे केंद्र सरकारचा थोडा सुद्धा लक्ष दिसून येत नाही. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 75 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, या वर्षाचे पिक कर्ज माफ करावे, फळ बागयतदारांना भरीव मदत द्यावी, खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या शेतजमिनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत मिळावी, अशी मागणी काँग्रेसतर्फेनिवेदनाव्दारे करण्यात आली.
याप्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजित पांडुरंग पाटील, डॉ. भक्तीकुमार दवे, कॅप्टन कलावत, नंदराज मुंगाजी, निर्मला म्हात्रे,हेमराज म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, लतीफ शेख, नौफील सय्यद, अमीर सय्यद विश्वनाथ चौधरी, पूजा मोहन, रेमंड गोवियस, आदम ढलाईत, आदित्य सावळेकर, भारती जळगावकर, संतोष चिखलकर, अरुण ठाकूर, अंकुश गायकवाड, अखिल अधिकारी, नित्यानंद म्हात्रे, सुधीर मोरे, अनुपमा चुढा, नीता शेनोय, डॉ. अमित दवे, आरती ठाकुर, अंजुम तेरवा, इ अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.