| चिरनेर | वार्ताहर |
गुळसुंदे ग्रामपंचायत व एमआयडीसी यांच्याबरोबर झालेल्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन तीन गावांतील शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने झाले आहे. त्यामुळे आता गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडवली, अकुलवाडी, गुळसुंदे तसेच आदिवासी वाड्यांना शुद्ध मुबलक पाणी मिळणार आहे. 2018 पासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता मोठे यश आले आहे. याकामी आ. महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी आला आहे.