रेशनवरील तांदूळ होणार बंद

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

केंद्र सरकार देशातील गरजूंना रेशनकार्डद्वारे मोफत रेशन देते. यामध्ये शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ दिला जातो. मात्र, त्यात मोठा बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मोफत तांदूळ देण्याऐवजी आता इतर नऊ वस्तू देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मोफत रेशन योजनेंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र, आता यात बदल करण्यात आला आहे.

Exit mobile version