| अलिबाग | वार्ताहर |
साहित्यसंपदाच्या वतीने कृष्णजन्माष्टमीचे औचित्य साधून नागपूर येथे काव्यवाचन सोहळा नुकताच पार पाडण्यात आला. यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन हा सोहळा यशस्वी करण्यात आला. हे कविसंमेलन नवोदित कवींसाठी हक्काचे व्यासपीठ ठरले. हे संमेलनाच्या ज्येष्ठ साहित्यिक अॅड. लखनसिंह कटरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी त्यांनी बोली भाषांचे महत्त्व पटवून देताना त्यांनी बोलीभाषांचे उच्चार शास्त्र अभ्यासणे गरजेचे आहे, असे सांगितले. कृष्णाच्या विविध रूपांप्रमाणे आपल्या मदतीस धावून येणार्या प्रत्येकात एक कृष्ण असतो. आपल्या नात्यांत नेहमी सकारत्मकता बाळगली आणि कृतकृत्य भावाने राहिले तर नात्याचा डोलारा संभाळण्यासोबत समाजभानसुद्धा राखले जाईल, असे मत सखा माझा कृष्ण उपक्रमाची माहिती देताना साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे व्यक्त केले.
समाजकार्यकर्ते मुन्नालालजी रहांगडाले ह्यांची विशेष उपस्थिती संमेलनास लाभली. समाजासाठी आपले विशेष योगदान देणार्या विकास ग्रुपचे किशोर पेटकर आणि करोना काळात आपली महत्पूर्ण भूमिका बजावणार्या हिरदिलाल ठाकरे यांचा कार्य सन्मानसुद्धा सदर संमेलनातून करण्यात आला, अशी माहिती स्वागताध्यक्षा जीविता पाटील यांनी दिली. जवळपास सहा तासांहून अधिक रंगलेल्या काव्यसंमेलनास विदर्भातील अनेक साहित्यिकांनी सहभाग नोंदवला आणि आपल्या कवितेतून समाजात आशावाद निर्माण केला. महंत कवी राजशास्त्री, संपदा गणोरकर आणि इतर निमंत्रित कवींनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना खिळवून ठेवले. विशेष म्हणजे, अवघ्या सहा वर्षीय स्पृहा मेहर ह्या बालिकेने आपल्या काव्य सादरीकरणातून उपस्थितांची वाहवा मिळवली. सर्व सहभागींना मनोमय मीडिया निर्मित सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली. सर्व शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, अशी माहिती प्रवक्ते मंजुळ चौधरी यांनी दिली. समन्वयक म्हणून वंदना मत्रे आणि वर्षा पटले यांनी काम पाहिले.