| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथे ज्येष्ठ नागरिक संस्थेच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून सभेचे आयोजन केले होते. ही सभा संस्थेचे अध्यक्ष ल.नी. नातू यांच्या अध्यक्षतेखाली वैद्य हायस्कूलच्या सभागृहात पार पडली. यावेळी संस्थेच्या ज्या सभासदांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत, अशा दाम्पत्यांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी निवेदक शरद कोरडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भूतपूर्व पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची 2 ऑक्टोबरला जयंती असल्याने त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर लग्नास पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत अशी दाम्पत्य सर्वश्री अविनाश बाळकृष्ण राईलकर, प्रकाश सदाशिव जोशी, सुरेश गजानन तारे, दत्तात्रेय रघुनाथ भोसले व महादेव वामन पाटील यांचा, त्याचप्रमाणे वयाला 80 वर्षे व 75 वर्षे पूर्ण झालेल्या सुमती गणेश आठवले, उषा शरदचंद्र पटवर्धन, अनुराधा सुभाष शिरे, अपर्णा अशोक म्हात्रे, सुनंदा गोपीनाथ रुईकर, सरस्वती गणपत थळे, प्रदीप कृष्णा पाटील व गोपाळ अनंत भिडे या सभासदांचा पुष्पगुच्छ श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष ल.नी. नातू, उपाध्यक्ष प्रफुल राऊत, सचिव यशवंत थळे, खजिनदार सुभाष क्षिरे यांच्यासह डी.डी. नाईक, ज्येष्ट पत्रकार बळवंत वालेकर, आर.के. घरत, दिलीप शिंदे, मेघना कुलकर्णी, राजा बने, शुभदा ठोसर, चारुशीला कोरडे आदि कार्यकारणी सदस्य व सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य गजेंद्र दळी यांनी खूप मेहनत घेतली होती. शेवटी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रफुल राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. नानासाहेब थोरात यांनी राष्ट्रगीत गायिले.