| दिघी | वार्ताहर |
रमजान महिन्यामध्ये अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या इफ्तार पार्टीमधून सामाजिक सलोखा राखला जातो. कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडवू नये. सोशल मीडियाद्वारे काही चुकीचे आणि फेक मेसेज पाठवले जातात, त्याला कोणीही बळी पडू नये. असे काही निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे. दोषींवर पोलिस प्रशासन निश्चित कडक कारवाई करेल, असे बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे बुधवारी (दि.19) पोलीस ठाण्यात आयोजित इफ्तार पार्टी मध्ये बोलत होते.
दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या वतीने ठाण्यात बुधवार सायंकाळी 7 वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी याप्रसंगी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक डॉ. प्रसाद ढेबे, श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महमद मेमन, सुकुमार तोडलेकर पत्रकार श्रीकांत शेलार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदू, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेते मंडळींनी एकमेकांना खजूर खाऊ घालून इफ्तार पार्टीचा आनंद घेतला.