। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मानवाकडून बेजबदार पणे समुद्रात केले जाणारे धोकादायक प्रदूषण,प्रकल्पाअंतर्गत वाढणारी वर्दळ, समुद्रातील जलचरांच्या एक प्रकारे जीवावर उठल्याचे चित्र दिसत असून मासळीचे प्रमाण घटते आहे. समुद्र किनारपट्टीवर किंवा समुद्रात जलक्रीडेने नेहमी मोहित करणारे डॉल्फिन दिसत नसल्याने चिंतेचा विषय बनला आहे.पर्यटन वृद्धीसाठी पर्यटकांचे निखळ मनोरंजन करणारा आणि भारतीय नौदलात मध्ये देवदूत ही भावना असणारे डॉल्फिन आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.
तीन महिन्यांपूर्वी मुरूड, एकदरा, दिघी, राजपुरी समुद्र खाडीत नेहमी समुद्रातून शिट्यांचा आवाज काढीत उसळी मारणार्या डॉल्फिनच्या जलक्रीडांचे दर्शन अनेकांना होत असे; मात्र मुरुडच्या किनार्यावर डॉल्फिन येणे बंद झाल्याने ही धोक्याचा सिग्नल तर नाही ना? असा प्रश्न डोकावू लागला आहे. भविष्यात येणारा धोका ओळखण्यात डॉल्फिन माहीर असतात अशी माहिती एकदरा गाव महादेव कोळी समाज अध्यक्ष तथा मुरूड तालुका मच्चीमार कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर यांनी बोलताना दिली. तीन महिन्यांपूर्वी पहाटे मुरूड च्या समुद्रकिनारी चक्क उथळ पाण्यात डॉल्फिन जलक्रीडा करताना शतपावली करणार्या मनोहर बैले, ऋषिकेश बैले, यांना दिसून आले होते. ऋषिकेश बैले यांनी एका डॉल्फिनला उचलून घेऊन छायाचित्र काढून सुरक्षितपणे पाण्यात सोडून दिले.त्यानंतर देखील दिघी – राजपूरी खाडी मुरूड- एकदरा खाडीत अधून मधून डॉल्फिन दिसत असत.सध्य स्थितीत दोन महिन्यांपासून मात्र डॉल्फिन चे दर्शन दुर्मिळ झाल्याचे दिसून येत आहे.कोणालाही काहीही इजा न पोहचविणारे डॉल्फिनला भारतीय तटरक्षक दलात आदराचे स्थान आहे.या बाबत पूर्वीच्या काळात घडलेली एक सत्यकथा असल्याची माहिती पांडुरंग आगरकर, यांनी दिली. समुद्रात जहाजातून चुकून पडलेल्या एका सैनिकाला एका डॉल्फिने पंखाच्या आधाराने सुरक्षतपणे किनार्यावर आणून सोडले. तेव्हा पासून भारतीय नौदलात डॉल्फिनला देवदूत मानले जाते.डॉल्फिनला कोणतीही इजा करणार्या ला भारत सरकार कडून शिक्षेची कडक तरतूद केलेली आहे.