रोह्यातील कालव्याचा पाणीप्रश्‍न पेटला!

ग्रामस्थांचे उपोषण सुरू

| रोहा | प्रतिनिधी |

आंबेवाडी ते निवी कालवा पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी सोमवारी (1 मे) महाराष्ट्र दिनापासून रोहा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पाण्यासाठी नागरीकांना उपोषण करावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.

आंबेवाडी ते निवी ग्रामस्थांना गेले 15 वर्ष पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रायगड पाठबंधारे विभाग कोलाड यांनी कालव्याचा पाणी बंद केल्याने विहिरी, नाले, बुजून गेले. शेती ओसाड झाली, शेतकरी हवालदिल झाला. पशुपक्षी गुरेढोरे, पाण्यासाठी भटकंती करत आहेत. या विषयी ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवला कालव्याच्या पाण्याची मागणी केली, अधिवेशनात विषय गाजला, ग्रामस्थांनी पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला परंतू कालव्याचा पाणीप्रश्‍न लालफितीत अडकल्याने अखेर स्थगित केलेले उपोषण 1 मे महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांनी सुरु केले आहे. जोपर्यंत कालव्याला पाणी सोडले जात नाही तोपर्यंत आंदोलन उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.

आ.अनिकेत तटकरे यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन सविस्तर चर्चा केली. परंतू आंदोनकर्त्य उपोषणावर ठाम राहिले. उपोषणास माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब मराठी पत्रकार परिषदेचे मिलिंद आष्टीवकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, अमित घाग, मा.उपसरपंच अमित मोहिते, मुस्लिम समाजाचे नेते उस्मानभाई रोहेकर, प्रशांत देशमुख, नरेश पडवळ आदी मान्यवर प्रतिष्ठित नागरीक उपोषणस्थळी उपस्थीत राहून ग्रामस्थांना समर्थन दिले.

यावेळी कालवा समन्वय समितीचे विठ्ठल मोरे, राजेन्द्र जाधव, सागर भगत, तुकाराम भगत, रुपेश साळवी, सूनील बामुगडे, रुपेश शिंदे, दीपक भगत, योगेश राऊत, प्रशांत राऊत, संतोष भोकटे, राकेश बामूगडे, हेमंत माने, शहानवाज मुकादम, संदेश मोरे, ज्ञानेश्‍वर बामुगडे, संकर साळवी, दीपक कळंबे, नंदकुमार बामुगडे, नरेश बामुगडे, रुपेश बामुगडे, सुरेश साळवी, रुपेश शिंदे, सतीश भगत, संतोष टेंबे, निखिल भगत, यांसह अनेक ग्रामस्थ, महीला मोठया प्रमाणात उपोषणास बसले आहेत. आंदोलन कर्ते जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

कालव्याच्या पाणी प्रश्‍नावर जो पर्यंत लेखी आश्‍वासन देत नाहीत तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, मेलो तरी बेहत्तर पण पाण्यासाठी आंदोलन करणार आहोत असे आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांनी सांगीतले आहे. प्रशासन काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version