| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील विद्या विकास मंडळाच्या विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेरळ गावात लेझीमच्या तालावर नाचत तिरंगा रॅली काढून जनजागृती केली.
शाळेच्या शैलजा निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली रॅली शाळेच्या आवारातील नेरळ गावात फिरली. त्यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम आणि ढोल ताशा यांच्या साथीने हातात तिरंगा घेवून तिरंगा रॅली काढली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी बाजारपेठ भागातील चौकात लेझिम पथकाचे संचालन केले. त्यावेळी नीलाक्षी सुर्वे,रेखा काळे,स्नेहा म्हसे, यशस्विनी सहस्त्रबुद्धे, ललिता बदे, नितीन सुपे, कोमल पळसकर, स्नेहल बदले, कांचन नाईक, रोहिणी कुडतरकर, अस्मिता पवार, सीमा दिघे, स्वाती तुपगावकर तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.