। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोलीमध्ये न भूतो ना भविष्य अशा ऐतिहासिक तिरंगा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या जवळपास सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या 75 महापुरुष आणि स्वातंत्र्यसैनिकांची वेशभूषा करत शालेय मुलामुलींनी सर्वांचे लक्ष वेधले.
यामध्ये नागरिकांसह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहून देशप्रेमाचे दर्शन घडवले. विद्यार्थ्यांनी हातात भारतीय ध्वज घेऊन भारत माता की जयचे नारे दिले. झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा…हा संदेश देत भावी पिढीने देशाप्रती असणारा अभिमान आणि राष्ट्रप्रेम यानिमित्ताने प्रकट केले. पनवेल महापालिकेच्यावतीने 8000 ध्वजांचे वाटप करण्यात आले.