मनविसेतर्फे हवालदार नेमणुकीची मागणी
। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील कोकण एज्युकेशन सोसायटी तसेच विनायक हरी परांजपे, थरवळ कन्या, तसेच आय.टी.आय. हे सर्व एकाच परिसरात असल्यामुळे शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
सध्या आंबेत पूल धोकादायक असल्यामुळे तो बंद असल्या कारणाने त्या मार्गावरील सर्व वाहतूक ही महाडच्या दादली पुलावर केली जात आहे. त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळेस म्हणजे सकाळी 11 ते 1 च्या दरम्यान या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी निदर्शनास आली असता त्यांनी याबाबत गुरुवारी (दि.16) महाड पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. या निवेदनातून त्यांनी या परिसरामध्ये सकाळी 11 ते 1च्या दरम्यान एका वाहतूक पोलीस हवालदाराची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी तेजस गांधी, विवेक ठोंबरे, ऋषिकेश शेडगे, प्रथमेश पवार आदी उपस्थित होते