। रायगड । खास प्रतिनिधी ।
पावसाळी पिकनिक जीवावर बेतल्याची घटना पेण तालुक्यातील पाबळ येथे घडली आहे. रेवदंडा येथील दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली.
थेरोंडा-रेवदंडा, ता. अलिबाग येथून चार तरुण पावसाळी पिकनिकसाठी पेण तालुक्यातील पाबळ येथे सोमवारी (दि.17) गेले होते. पाबळ येथील बरडावाडी परिसरात नदीमध्ये पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने इलान बेंजामीन वासकर (25) व इजरायल बेंजामीन वासकर (22) हे दोन सख्खे भाऊ वाहून गेले. या बाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच शोधा शोध केली असता दोन्ही भावांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणाची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.