। मुंबई । वृत्तसंस्था ।
डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल आणि अष्टपैलू कौशल तांबे या भारताच्या युवा विश्वचषक विजेत्या संघातील दोन खेळाडूंना महाराष्ट्राच्या रणजी संघात स्थान देण्यात आले आहे. ग-गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राची 17 फेब्रुवारीपासून हरयाणाशी पहिली लढत सुरू होणार आहे. अंकित बावणेच्या नेतृत्वाखालील या संघात आघाडीचा फलंदाज राहुल त्रिपाठीकडे उपकर्णधार सोपवण्यात आले आहे. ऋतुराज गायकवाडची वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठी निवड झाल्याने तो रणजीच्या साखळी टप्प्यासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने म्हटले आहे.