विराटच्या नावावर भलताच विक्रम

आठ वर्षांनी झाला शून्यावर बाद

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहलीही रोहित पाठोपाठ तंबूत परतला. त्याला आपले खातेही उघडता आले नाही. अशा प्रकारे विराट कोहली कसोटीत तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना आठ वर्षांनंतर शून्यावर बाद झाला आहे.

पावसामुळे पहिला दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर भारताने दुसर्‍या दिवशी सकाळी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माला सातव्या षटकात बाद केल्यानंतर कोहलीने 2016 नंतर प्रथमच कसोटीत शून्यावर बाद झाला आहे. त्याला विल्यम ओरुरकेने झेलबाद केले. वास्तविक, मानदुखीमुळे गिल आजचा सामना खेळत नाही, त्यामुळे विराट कोहलीला तिसर्‍या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. त्याने 9 चेंडूंचा सामना केला आणि खाते न उघडता परतला.

विराट कोहलीने कसोटी कारकीर्दीत सर्वाधिक चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण जेव्हा-जेव्हा त्याला तिसर्‍या क्रमांकावर खेळायला पाठवले, तेव्हा त्याने संघाला निराश केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके झळकावणार्‍या विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये तिसर्‍या क्रमांकावर एकही अर्धशतकही झळकावता आलेले नाही. यानंतरही कोहलीलातिसर्‍या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय का घेण्यात आला? असा प्रश्‍न चाहत्यांना पडला आहे. किसोटीत तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना कोहलीची सरासरी केवळ 16.16 राहिली आहे. आतापर्यंत तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने केवळ 41 धावांची सर्वोच्च खेळी साकारली आहे. म्हणजेच त्याच्या खात्यात अर्धशतकही नाही. आजच्या डावाचाही समावेश केला तर तो आतापर्यंत सात वेळा या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. विराट कोहली याआधी कसोटीतील 32 डावांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या वेळी पण न्यूझीलंडविरुद्धच शून्यावर बाद झाला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता.

Exit mobile version