प्रवासी, विद्यार्थी संभ्रमात
। सुतारवाडी । वार्ताहर ।
गेल्या सहा महिन्यांपासून एसटीचा दीर्घ संप काही केल्या मिटेना. यामुळे असंख्य प्रवाशांसह विद्यार्थीही मोठ्या संभ्रमात आहेत. कोरोनाची भीती आता उरलेली नाही. आता सर्व व्यवसाय सुरू झालेत. शासनाने सर्व बंधने हटविली असून, नव्या जोमाने अनेक व्यावसायिक उत्साहाने दुकाने पूर्वीप्रमाणे चालवत आहेत. मात्र, एसटीच्या गाड्या अगदी तुरळकपणे धावत असून, अद्यापही संप न मिटल्यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनांसाठी जादा पैसे भरावे लागत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
लग्नसराईचे दिवस सुरु झाले असून, खरेदीसाठी अनेकजण शहराकडे धाव घेत आहेत. एसटी संपामुळे खासगी वाहन करून खरेदी करणे परवडत नाही. थोड्याच दिवसात, म्हणजे मे महिन्यात विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतील. काही शिक्षक आपल्या कुटुंबासह नोकरीनिमित्त सांगली, सातारा, अकोला, बीड, नाशिक, मालेगाव, पुणे अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्यांना खासगी वाहन केल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे एसटी सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी सर्व स्तरातून हात आहे.