। रेवदंडा । वार्ताहर ।
अलिबाग तालुका सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने शौर्या तुला वंदितो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते 37 वीरांचा सन्मान करण्यात आला.
अलिबाग तालुका सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे सहाण बायपास रोड येथील श्री मंगल कार्यालयात आयोजन केले होते. या कार्यक्रमास 250 हून अधिक सेनानी व नागरिकांनी उपस्थिती नोंदविली होती. या कार्यक्रमास उपस्थित वीरांचे तसेच मान्यवर व नागरिकांचे सह्याद्री प्रतिष्ठान अलिबागच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संजय पाडेकर व तालुका अध्यक्ष सिद्धेश शेवणईकर यांनी आभार व्यक्त केले.