। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील वनविभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्तपणे सापळा रचत समुद्रीजीव वालरस याच्या सुळ्यांची तस्करी करण्यासाठी हातखंबा येथे आलेल्या तिघांना अटक केली. याप्रकरणी, मुहंमद नुमान यासिन नाईक, हेमंत सुरेश कांडर आणि राजनदयाळ पांगे या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. करण्यात आलेल्या कारवाईत वालरसचे सुळे आणि एक इर्टिगाकार, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.