। उरण । प्रतिनिधी ।
कार्तिकी एकादशीच्या पवित्र वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीचा कामशेत घाटात भीषण अपघात झाला. उरण येथील श्री दावजी पाटील दिंडी आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी जात असताना घाटातील वळणावरून उतरत असलेला कंटेनर थेट दिंडीत घुसला. दरम्यान कांमंजुळा तांडेल नावाची वारकरी महिला हिचा जागीच मृत्यू झाला आहे. ती उरण तालुक्यातील करळ गावातील आहे, तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघाल्या होत्या पण तेव्हाच त्यांच्यावर काळाने घातला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी धावले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर महावीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारकऱ्यांमध्ये सुरक्षिततेसंबंधी चिंता आणि रस्त्यावर प्रशासनाची तत्परता वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून, त्यांच्याकडून घाटात रस्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.







