पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले संकेत
। आंबेत । प्रतिनिधी ।
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि मुख्य करून दक्षिण कोकणातील मुख्य प्रवेशद्वार समजला जाणारा आंबेत सावित्री पूल हा दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्व प्रवाशी वर्गांसाठी खुल होणार असल्याची प्रतिक्रिया सोमवारी (दि.21) पाहणी दरम्यान उपस्थित असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
येत्या 26 तारखेला या पुलावरील प्रवासाचा पहिला ट्रायल आणि इतर सर्व गोष्टींचा आढावा घेतला जाणार असून संबंधित बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी यावेळी उपस्थित पाहणी दरम्यान सांगितले. डागडुजी करण्यात आलेल्या सावित्री पुलाची पुढील मर्यादा ही किमान पंधरा वर्षे टिकणार असल्याचे सनरचना कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम विभाग यांच्यावतीने सांगण्यात आले.
कोंकणातील मुख्यतः मंडणगड, दापोली, खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणारा मार्ग ओळखला जातो. त्यामुळे आता सर्व प्रवाशी वर्गासहित, शैक्षणीक इतर व्यवसायिकांच्या ठप्प प्रतिक्षेला अधिक चालना मिळणार आहे. यावेळी दापोली मतदार संघाचे माजी अ. संजय कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बामणे, राऊत, सनरचना कंपनीचे एकसिक्युटिव्ही मॅनेजर जोशी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पर्यटनाच्या दृष्टीने हा पुल महत्वाचा असल्याने येत्या पाच वर्षात नवीन पुलाचे देखील काम हाती घेतले जाणार आहे.
-आदिती तटकरे, पालकमंत्री