। अलिबाग । सिद्धी भगत ।
भारतात केरळमधील 5 वर्षाखालील मुलांना टोमॅटो फ्लूची लागण लागली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या 82 रुग्णांची नोंद झाली आहे. कोल्लम जिल्ह्यातील आर्यनकावू, आंचल आणि नेदुवाथूर सारख्या भागात या फ्लूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या टोमॅटो फ्लूने मुंबई लगतच्या शहरातील पालकांची चिंता वाढली आहे.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार हा टोमॅटो फ्लू वातावरणात बदल झाल्यानंतर होतो. हवामानात बदल झाल्यानंतर या फ्लूचे विषाणू वातावरणात अधिक प्रमाणात पसरतात. डिहायड्रेशनमुले व ताप तसेच थकव्यामुळे लहान मुलांना हा आजार जास्त जखडतो. या आजाराचा कालावधी 5 ते 7 दिवसांचा आहे.
लहान मुलांमध्येच अधिक सक्रिय
टोमॅटो फ्लू संसर्गजन्य आजार आहे, असे डॉक्टर सांगतात. लहान मुलांना या आजाराची लागण लवकर लागते. 5 ते 8 वर्षांखालील मुलांमध्ये हा टोमॅटो फ्लू अधिक साक्रीय झालेला दिसून येतो. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे लहान मुले या आजाराच्या जपेट्यात लवकर येतात.
टोमॅटो फ्लूची नेमकी लक्षणे काय?
साधारण 5 ते 8 वर्षांखालील मुलांना होणार्या या आजारात ताप येणे, अंगावर लाल पुरळ उठणे, हात पायांचा रंग बदलणे, गुढग्याचा रंग बदलणे, सर्दी होणे, तोंडात फोड येणे त्याचबरोबर पुरळ उठलेल्या जागेवर खाज येणे, डिहायड्रेशन होणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
लहान मुलांना जर हा आजार झाला तर पालकांनी लवकरात लवकर डॉक्टरांनाशी संपर्क साधावा त्याच बरोबर तज्ञ सांगतात कि, लहान मुलांचे कपडे त्यानी वापरलेला साबण त्यांचा टॉवेल त्याच्या निगडित वस्तू या इतरांपासून वेगळ्या ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर ताप आला तर डॉक्टरांशी संकर साधून योग्य ती औषधे घेणे गरजेचे आहे, मुलांना भरपूर पाणी प्यायला देणे, पुरळ आलेली फोडी फोडून न देणे तसेच त्यांचा इतरांशी जास्त संपर्क येऊन न देणे ही काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे.
घाबरु नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या!
मुलांना टोमॅटो फ्लू झाल्यास पालकांनी घाबरू न जात त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विनायक पाटील यांनी पालकांना केले आहे.