| लंडन | वृत्तसंस्था |
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा फलंदाजी करत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना डिवचले. त्यामुळे शमी-बुमराची कामगिरी अधिक उंचावली आणि आपोआपच सर्व खेळाडूंमध्ये ऊर्जेचा संचार झाला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर व्यक्त केली.
संपूर्ण संघाचा मला अभिमान आहे. लॉडर्सवर विजय मिळवणे, हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. मात्र प्रत्येकाने महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावल्याने हे साध्य झाले. इंग्लंडच्या संघाला 60 षटकांत गुंडाळू, याची खात्री होती. वेगवान गोलंदाजांच्या जिगरबाज वृत्तीला माझा सलाम,फफ असे कोहली म्हणाला.
दुसर्या डावात शमी-बुमरा यांनी केलेली भागीदारी निर्णायक ठरली. त्यांना इंग्लंडच्या खेळाडूंनी विनाकारण डिवचल्यामुळे मीसुद्धा ड्रेसिंग रूममध्ये संतप्त झालो. मात्र तेथून शमी-बुमरा यांनी सुरेख फलंदाजी केली आणि मग गोलंदाजीसाठी मैदानावर उतरताच त्यांनी इंग्लंडची त्रेधातिरपीट उडवली. त्यांचा जोश पाहून संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास बळावला,फफ असेही कोहलीने सांगितले. सामनावीर के. एल. राहुलनेसुद्धा संघाच्या झुंजार वृत्तीचे कौतुक करताना स्वत:च्या फलंदाजीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत, असे विराटने सांगितले. दुसर्या डावात भारताच्या आघाडीच्या फळीला लवकर बाद केल्यानंतर तळाच्या फलंदाजांना कमी लेखणे आम्हाला महागात पडले, अशी कबुली इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पराभवानंतर दिली. या पराभवाची मी पूर्णपणे जबाबदारी घेतो, तळाच्या फलंदाजांना कमी लेखणे भोवले, अशी प्रतिक्रियाही त्याने व्यक्त केली.
- इंग्लंडच्या सध्याच्या कसोटी संघात फक्त जो रूटच मोठी खेळी साकारण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरतो, असे मत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. कसोटी क्रिकेटला का इतके मानले जाते, हे आज पुन्हा सिद्ध झाले. आव्हानात्मक परिस्थितीतही भारताने केलेले पुनरागमन कौतुकास्पद आहे. – सचिन तेंडुलकर,क्रिकेटर
भारत उर्वरित सामने जिंकेल -गावस्कर
इंग्लंडकडून रूट आणि अँडरसन हे दोघेच फक्त भारताला झुंज देत आहेत. त्यामुळे उर्वरित मालिकेतही भारताचेच वर्चस्व पाहायला मिळेल, असे महान फलंदाज सुनील गावस्कर यांना वाटते. ङ्गङ्घइंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटसाठी परिपूर्ण वाटत नाही. रूट आणि अँडरसन या दोन खांबावरच त्यांची सर्वस्वी मदार आहे. त्यामुळे हवामानाने खोळंबा न केल्यास भारत ही मालिका 4-0 किंवा 3-1 अशा फरकाने जिंकेल,फफ असे गावस्कर म्हणाले.