। लखनौ । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये 4 मुलांचा मृत्यू झालाय. एकाच दिवशी 4 मुलांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय. मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. दारात टॉफी चॉकलेट फेकण्यात आली होती आणि ती मुलांनी खाल्ल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कसया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिसईमधील लठउर टोला इथं ही घटना घडली. मृतांमध्ये दोन मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे.