राज्यसभेत घोषणा देण्यास बंदी

| नवी दिल्ली |वृत्तसंस्था |
कोणताही राज्यसभा खासदार 60 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सभागृहात अनुपस्थित राहिल्यास त्याची जागा कायमस्वरूपी रिकामी करण्याचा निर्णय राज्यसभा कार्यालयाने घेतला आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन चार डिसेंबरपासून सुरु होत आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सभागृहातील सदस्यांसाठी नव्या नियमांची नियमावली जारी करण्यात आल्याने राज्यसभा खासदारांची पंचाईत होणार आहे.

संसदेमधील एकाच वेळी दोन राज्यसभा खासदारांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती बोलत असताना सभागृहातील कोणत्याही सदस्याला सभागृह सोडून जाण्यास बंदी असणार आहे, आदी नियमांचाही यात समावेश आहे.

Exit mobile version