• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Water Scarcity: रायगडात पाणीसंकट गडद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 16, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

टँकर्सचा आकडा पंचाहत्तरी पार; लाखो नागरिकांना पाणीटंचाईचा फटका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या पावसाने अद्याप पाठ फिरवल्यामुळे ऐन पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला असून, अनेक धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. 92 गावे, 303 वाड्या अशा एकूण 395 ठिकाणी असलेल्या दीड लाख नागरिकांना पाणीटंचाई फटका बसत असून, 78 टँकरद्वारे त्यांची तहान भागविण्याचे काम सुरू आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईला सुरुवात झाली. सुरुवातीला अलिबाग व पेण तालुक्यातील गावांचा समावेश होता. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला. लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणारी धरणे तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारित येणारे पाझर तलावांमधील जलसाठा कमी झाला. धरणांसह पाझर तलावांमधील पाणीसाठा अवघा 18 टक्केच शिल्लक आहे. काही धरणांमधील जलसाठा संपला असून, काही धरणांमध्ये जलसाठा संपण्याच्या वाटेवर आहे. धरणांनी तळ गाठल्याने मातीमिश्रीत पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. गतवर्षी जून महिन्याच्या पंधरा दिवसांत धरणांसह शेते पाण्याने भरली होती. यंदा मात्र जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही पाऊस अद्याप पडलेला नाही.
त्यामुळे पाणीसंकट गंभीर झाले आहे. जिल्ह्यातील 92 गावे, 303 वाड्यांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे. एक लाख 53 हजार 157 नागरिकांना या टंचाईचा फटका बसत आहे. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ या नागरिकांवर आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून या गावे व वाड्यांमधील नागरिकांसाठी 78 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. परंतु, पाणी मुबलक मिळत नसल्याने पाण्याची समस्या भेडसावू लागली आहे. सर्वात जास्त पाणीटंचाई महाड, कर्जत, पेण, त्याखालोखाल पनवेल, माणगाव, म्हसळा, मुरूड, तळा, अलिबाग, पोलादपूर, रोहा, खालापूर, पोलादपूर या तालुक्यांमध्ये पाणीसमस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी महाड तालुक्यातील 17 गावे, 111 वाड्यांमध्ये 11 टँकर्स, कर्जतमधील सात गावे, 22 वाड्यांमध्ये 14 टँकर्स. पेणमधील 13 गावे, 78 वाड्यांमध्ये 12 टँकर्स या तालुक्यांमध्ये सर्वात जास्त पाणीटंचाई असल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. महाडमधील 32 हजार, पेणमधील 27 हजार, म्हसळामधील 13 हजार, पनवेलमधील 18 हजार, कर्जतमधील 13 हजार 112 नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. अलिबागमधील आठ हजार 782, उरणमधील चार हजार 505, खालापूरमधील आठ हजार 588, सुधागडमधील एक हजार 768, रोहामधील दोन हजार 556, माणगावमधील नऊ हजार 297, पोलादपूरमधील सहा हजार 455 श्रीवर्धनमधील चार हजार 569, मुरूडमधील एक हजार 39 आणि तळामधील 373 नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. पाऊसच पडत नसल्याने पाणीपुरवठा कसा उपलब्ध करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

शेतकरी हवालदिल
गतवर्षी पावसाने हजेरी लवकर लावली. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपासूनच पेरणीला सुरुवात झाली होती. त्यामुळे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून भात लागवडीसाठी रोपे तयार झाली होती. काही ठिकाणी लावणीच्या कामांना सुरुवात झाली होती. यंदा पावसाने विलंब केला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भात बियाणांची पेरणी करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे. काही शेतकऱ्यांनी धूळवाफे पेरणी केली आहे. परंतु, पाऊस नसल्याने ते शेतकरीदेखील अडचणीत सापडले असल्याचे बोलले जात आहे.
बांधावरील भाजीपाला संकटात
पाऊस पडेल या आशेवर राहून अनेक शेतकऱ्यांनी बांधावर भाजीपाला लागवड केली आहे. दुधी, भेंडी, चवळीसह अन्य भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना बोअरवेल आणि विहिरीमधील पाण्यामार्फत जगविण्याचे काम केले जात आहे. मात्र, विहिरीसह बोअरिंगदेखील कोरड्या पडण्याची भीती निर्माण झाली आहे. बांधावरील भाजीपाला पीक संकटात येण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जून महिना संपत आला, तरी पाऊस पडला नाही. पाण्याचा दुष्काळ निर्माण होत असताना भाजीपाला, भातपीक लागवड करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाऊस पेरणीयोग्य समाधानकारक पडत नाही, त्याचा फटका बसण्याची भीती आहे.

सतीश म्हात्रे,
शेतकरी

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater issuesWater scarcityWater shortage
Previous Post

थेट कफ सिरप विक्रीवर बंदी

Next Post

पनवेल रेल्वे पोलिसांचे ‘झिरो मिशन डे’ अभियान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कोपर खारबंदिस्ती कोसळली
sliderhome

कोपर खारबंदिस्ती कोसळली

July 9, 2026
sliderhome

खंडाळे अतिक्रमण प्रकरण तापले; उपसरपंचांसह दोन सदस्य अडचणीत

July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध

July 9, 2026
परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम
sliderhome

परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम

July 9, 2026
sliderhome

गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

July 9, 2026
Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!
sliderhome

Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!

July 9, 2026
Next Post
पनवेल रेल्वे पोलिसांचे ‘झिरो मिशन डे’ अभियान

पनवेल रेल्वे पोलिसांचे ‘झिरो मिशन डे’ अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?