| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.
रिफायनरीच्या या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी भाजपचे माजी खासदार निलेश राणे बारसू गावात आले होते. यावेळी त्यांना आंदोलकांनी घेराव घालून जाब विचारला. जोपर्यंत रिफायनरी प्रकल्प रद्द होणार नाही, तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा या आंदोलकांनी घेतला. या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केल्याने बारसूतील वातावरण तापलं आहे.
बारसूसह आजूबाजूच्या सहा गावात 100 टक्के ग्रामस्थांचा विरोध आहे. पण रिफायनरीचे दलाल त्या ठिकाणी जात आहेत. केंद्र आणि राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल आहे. ते रिफायनरीचे समर्थक आहेत. त्यामुळे आंदोलकांचं प्रामाणिकपणे म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये. पोलिसांची दादागिरी सुरू आहे. 400 लोकांना तडीपारीच्या नोटिशी दिल्या आहेत. सरकार आणि रिफायनरीच्या दलालांकडून हा अन्याय सुरू आहे. बारसूत रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा सरकार घाट घालत आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला आमचा कडाडून विरोध असून ग्रामस्थांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
रिफायनरी प्रकल्प होणार म्हणून 224 गुजराती आणि मारवाडींनी या परिसरात जमिनी विकत घेतल्या होत्या. हे मी दाखवून दिलं आहे. जनतेच्या हितासाठी ही रिफायनरी नाही. ती भूमाफियांच्या हिताची आहे.
खासदार विनायक राऊत