मनोजकुमार गोयल यांची ग्वाही
| मुंबई | प्रतिनिधी |
लिज्जतच्या पुढील विकास आणि प्रगतीसाठी मी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम मंत्रालयांतर्गत कार्यरत खादी ग्रामोद्योग आयोग (केवीआयसी)चे अध्यक्ष मनोजकुमार गोयल यांनी दिली. 26 जुलै रोजी लिज्जत संस्थेच्या वांद्रे येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ग्रामोद्योग आयोगाचे आर्थिक सल्लागार व आयोगाचे संयुक्त-मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नारायण शुक्ला, राज्याचे संचालक मनीष कांबळे, संचालक, संचालक पी.के. सतपथी, एबीएफपीआय आणि केवीआयसीचे अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी लिज्जत संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर यांनी उपाध्यक्षा पतिभा सावंत व अन्य सदस्य-भगिनींसह संस्थेच्या परंपरेनुसार मनोजकुमार यांचे स्वागत केले. गोयल यांनी संस्थेच्या वांद्र स्थित चपाती युनिटला भेट दिली. यावेळी त्यांनी भगिनींनी केलेल्या चपात्या आणि संपूर्ण उत्पादन प्रक्रियेचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांच्यामार्फत चालणारे संस्थेचे कार्य प्रत्यक्ष जाणून घेऊन, संस्थेच्या दैनंदिन कामकाजाची व कार्याची प्रशंसा केल्याबद्दल लिज्जत परिवाराच्या वतीने संस्थाध्यक्षा स्वाती पराडकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
लिज्जतची भेट हा माझ्यासाठी खूप चांगला, एक वेगळा आणि उत्तम अनुभव होता. लिज्जतच्या शाखांद्वारे चालणारे संस्थेचे कार्य खूपच स्पष्ट आणि विस्तृत आहे. लिज्जत पापडच्या सर्वच सदस्य-भगिनी खूप प्रेमळ, दयाळू आहेत. त्यांच्या कार्यासाठी माझ्या अनेकानेक शुभेच्छा.
मनोज कुमार गोयल, अध्यक्ष, केवीआयसी