पोलादपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात विजय वडेट्टीवार यांची घोषणा
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कोणत्याच निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ता अन्य पक्षांच्या चटईवर बसणार नाही तर तो ‘एकला चलो’चा नारा देऊन स्वतंत्रपण जोपासत अवघा रायगड जिल्हा काँग्रेसमय करणार असल्याचा निर्धार काँग्रेसचे रायगड संपर्कमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी (18 नोव्हेंबर) पोलादपूक येथे व्यक्त केला.
भाजपने देशातील काँग्रेसने उभारलेल्या अनेक प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा सपाटा सुरू केलेला असताना एस.टी.महामंडळाच्या सरकारीकरणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा देणे हे दुटप्पीपणाचे वागणे चुकीचे आहे.
विजय वडेट्टीवार,मंत्री
रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर येथे रायगड जिल्हा काँग्रेसचा मेळावा आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी चारूलता टोकस, श्रीरंग बरगे, प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील महिला काँग्रेस अध्यक्षा श्रध्दा ठाकूर हनुमंत जगताप,नगराध्यक्षा स्नेहल जगताप-कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेसने काय केले ते सांगा
काँग्रेसने काय केले सांगण्याची आणि केंद्रातील सरकार काय करीत आहे हे समजवून सांगण्याची. मोजक्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रोज एक तास घराघरात जाऊन संपर्क साधला तर संपूर्ण मतदार संघातील तब्बल 20 पोलींग बूथपर्यंत अल्पावधीमध्येच काँग्रेसचे विचार पोहोचविता येतील, असे ते म्हणाले.
प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये कंगना राणावतविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे, अशी खरमरीत टीकाही वडेट्टीवार यांनी केली. नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी संपर्कमंत्री म्हणून महाड व पोलादपूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण कार्यकर्त्यांना आगामी निवडणुक काळामध्ये काँग्रेसपक्षाची ताकद देण्याचे आवाहन केले. चारूलता टोकस यांनी, बॅरिस्टर अंतुले, मधुकर ठाकूर आणि माणिकराव जगताप या स्वर्गीय नेत्यांच्या रायगड जिल्हयातील कार्यकर्त्यांना येत्या निवडणुकीमध्ये मोठया प्रमाणात ताकद देण्याचे काम करणार असून, अलिबाग पेणपासून महाड-पोलादपूरपर्यंत काँग्रेस पक्षसंघटना वाढविणार असल्याचे सांगितले. प्रारंभी तालुका काँग्रेसध्यक्ष अजय सलागरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन शिंदे, माजी नगरसेविका शुभांगी चव्हाण, उपसभापती शैलेश सलागरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन योगेश शिंदे यांनी केले.