। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील आवास ग्रापपंचायतीचे सरपंच अभिजीत कवळे यांनी निवडणूकीवेळी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबतच्या शपथपत्रामध्ये आपल्या मालमत्तेविषयी चुकीची आणि अपूर्ण माहिती दिली आहे. तसेच त्यांनी वार्षिक उत्पन्नाबाबत देखील चुकीची माहिती दिलेली असल्यानेे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन पद रद्द करण्याची मागणी जयेंद्र राणे यांनी केली आहे. या अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी प्रलंबित असून अलिबाग तहसिलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
सदर अर्जात दिलेल्या माहितीनुसार अभिजीत राणे यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना सादर केलेल्या शपथपत्रात आवासमधील अनेक मालमत्तांचा उल्लेखच नाही. यात सर्व्हे/गट नंबर रांजणपाडा 93 (564), आवास मधील 611 (1393), 371 (861), 354 (836), 136 (176), 263/1(471), 374(627), 203/1(384/1) येथील मालमत्तांची माहितीच दिलेली नाही. तसेच गट नंबर 552-1 तर घर क्रमांक 527-सी, गट नंबर 286-1, 1478, आवास गट नंबर 845-1 टेकाली गट 284, घर नंबर 1264, सिटी सर्वे नंबर 584-ए घर क्रमांक 276, गट नंबर 137 घर नंबर 2, गट नंबर 203/1 घर क्रमांक 514, गट नंबर 601 घर क्रमांक 1530, 286-1 आणि 2 घर क्रमांक 1414, आणि 1415, तसेच गट नंबर 677 घर क्रमांक 192 अशा घरांचा समावेश करण्यात आलेला आहे.
अशा अनेक मालमत्तांचा आपल्या उल्लेख प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवण्यात आले असल्याने अभिजीत कवळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रलंबित आहे.