पेण भाजी मार्केटच्या रस्त्याबाबत विधीमंडळात चर्चा करा: विष्णू पाटील यांची मागणी

| पेण | प्रतिनिधी |
पेण भाजी मार्केटच्या चोरीस गेलेल्या रस्त्या संदर्भात सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा केली जावी,अशी शिवसेना नेते विष्णू पाटील यांनी ठाकरे गटाच्या शिवसेना आमदारांकडे केली आहे. विष्णू पाटील यांनी विक्रम मिनिडोअर चालकांच्या थांब्याचा प्रश्‍न हाती घेतला आहे. हा प्रश्‍न हाताळत असतानाच त्यांच्या लक्षात आले आहे की पेण येथील भाजी मार्केट तथा शॉपिंगमॉलचे बांधकाम फेब्रुवारी 2018 ला सुरू झाले. त्यावेळी या इमारतीचा आराखडा निश्‍चित करण्यात या शॉपिंग मॉलमध्ये जाण्यासाठी योग्यप्रकारे रस्त्यांची सोय केलेली होती. मात्र जस जसे या इमारतीचे बांधकाम होण्यास सुरूवात झाली आणि या इमारतीच्या ठेकेदाराने मन मानेल तसे आपले बांधकाम सुरू केले. मुळ नकाशावर असलेल्या रस्त्यांची रुंदी अचानक कमी होण्यास सुरूवात झाली असल्याचे विष्णू पाटील यांचे म्हणणे आहे.

मुळ नकाशामध्ये इमारतीच्या सभोवताली मीटरचा रस्ता असल्याचे दिसून येत आहे. तसेच मागच्या बाजूस गाडी फिरवता यावी म्हणून इमारतीच्या मागच्या बाजूस दोन्ही कोपर्‍यांवर रस्त्यांची रुंदी जास्त आहे. ती म्हणजे विक्रम स्टॅन्ड च्या बाजूला 3.06 मीटर तर सरकारी दवाखान्याच्या बाजूला 3.19 मीटर एवढी आहे. आता इमारत पूर्ण झाल्यावर विक्रम स्टॅन्डच्या बाजूनी समोर साडेचार फुट त्याच मागच्या बाजूस अडीच फुट तर राधिका हॉटेलच्या बाजूने संरक्षण भिंत घालणे गरजेचे होते. परंतु ती न घातल्यामुळे समोर तीन मिटरचा रस्ता उपलब्ध होत आहे.याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

मात्र, राधिका हॉटेलच्या बाजूने संरक्षण भिंत घातल्यास या रस्त्यांची रुंदी निश्‍चितच कमी होईल. तर बरोबर त्याच्या मागच्या साईटला सरकारी दवाखान्याच्या बाजूने मीटर र रस्त्यांची आवश्यकता होती त्या ठिकाणी देखील साडेचार फूट रुंदीचा रस्ता आहे. ज्या वेळेला भाजी मार्केट तथा शॉपिंग मॉल बांधण्याचे ठरले त्यावेळेला या इमारतीच्या सभोवताली (फळभाज्या) माल घेउन येणार्‍या गाडया फिरवता येतील अशा विचाराने या इमारतीची डिझाईन केली होती. परंतु ज्या वेळेला इमारत पूणर्र् झाली त्या वेळेला मात्र दिसणारे रस्ते गायब झाल्याचे निदर्शनास आले आहेत. याच मुद्दयाची सखोल चौकशी करून येत्या अधिवेशनात भाजी मार्केटचा चोरीस गेलेल्या रस्त्या विषयी अधिवेशनात चर्चेला मुद्दा घ्यावा अशी विनंती शिवसेनेच्या आमदारांकडे केली असून या अधिवेशनात पेण भाजी मार्केट चा प्रश्‍न गाजण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Exit mobile version