ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा

। सारळ । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठ्याचे प्रमाण वाढले असून,याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे. दैनंदिन कामकाज करताना येणार्‍या घामाच्या धारामुळे जीव नकोसा होत असताना त्यात लाइट वारंवार जाण्याचा प्रकार सारळ, नावखार, मिळकतखार परिसरात घडत असल्याने ग्रामस्थ हैराण होत आहेत. त्यासाठी संबधित विभागाने लक्ष देऊन हा विजेचा सावळा गोंधळ थांबवावा अशी मागणी परिसरातील सर्वच जनतेकडून केली जात आहे. वीजमंडळाच्या कारभारावर नाराज होताना एका बाजूला हा उन्हाळा आता संपावा आणि थंडावा निर्माण होण्यासाठी पाऊसाचे आगमन आता लवकर व्हावे अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Exit mobile version