। कोर्लई । वार्ताहर ।
शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनातून कातकरी उत्थान योजनेतून शैक्षणिक तसेच विविध कामांसाठी आवश्यक दाखले गावातच उपलब्ध व्हावेत.यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रम घेण्यात येत असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे काशिनाथ वाघमारे यांनी आयोजित करण्यात आलेल्या दाखले वाटप, आरोग्य शिबीर तसेच विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करताना तहसीलदार गोविंद वाकडे यांनी सांगीतले.
यावेळी शासनाच्या विविध योजना, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले या बाबत माहिती दिली. बालविवाहास कायद्याने बंदी असून लग्नाचे वय मुलांसाठी 21 तर मुलींसाठी 18 असून बालविवाह रोखण्यासाठी तहसीलदार गोविंद वाकडे यांनी आवाहन केले.यावेळी त्यांच्या हस्ते आदिवासी समाजातील इ.10 वी.व इ.12 वी.तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार गोविंद वाकडे, निवासी नायब तहसिलदार रविंद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, रमेश नागांवकर, गटविकास अधिकारी सुभाष वाणी,राजेंद्र चुनेकर,विजय मापूसकर,सुनील शेळके, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील निधी अभ्यंकर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ व विशेष करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.