निबंध स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न

| उरण | वार्ताहर|
राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र अलिबाग, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय खुल्या गटातील निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

श्री साई मंदिर देवस्थान साईनगर वहाळ येथे देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक हरिश्‍चंद्र नामदेव पाटील- दिघाटी, द्वितिय क्रमांक नैनिता नरेश कर्णिक, तृतीय क्रमांक विजय राम साईलकर यांनी पटकावले. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रक्कम दोन हजार रुपये, दीड हजार रुपये व एक हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे चैताली किरण म्हात्रे, सन्मेश स्वयंम धर्मा ओवळेकर या उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विद्याधर पाटील. स्नेहल पाटील यांचे सहकार्य लाभल. यावेळी निलेश म्हात्रे, मो.का.मढवी,धनंजय तांबे, राजू मुंबईकर, मनोज पाटील,किरण मढवी,आकाश घरत, सुनिल ठाकूर, दिनेश पाटील, डॉ. विजय हंकारे, चिंतामण पाटील, रुपेश मढवी, प्रणित मढवी, रोहित कोळी, अनिल कांबळे, सचिन पाटील, राकेश जाधव उपस्थित होते.

Exit mobile version