जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील रास्त भाव धान्य संघटना आक्रमक झाली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेने धडक देत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास 18 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आणि कार्याध्यक्ष शेखर देशमुख यांनी दिला आहे. तरीदेखील दखल न घेतल्यास 2 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले.
ऑल इंडिया फेअर प्राईस ऑफ डिलर्स फेडरेशन आणि अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक ऑल इंडिया फेअर प्राईस ऑफ डिलर्स फेडरेशन नवि दिल्ली आणि अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानुसार कोरोना काळामध्ये जे दुकानदार किंवा त्यांचे कुटूंबातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावली आहे. त्यांना शासनामार्फत 5 लाख रुपये सहाय्य मिळावे. राष्ट्रीय खादय सुरक्षा योजना सर्व दुकानदार विक्रेत्यांना (थेीश्रव ऋेेव झीेसीराा) प्रमाणे प्रति क्वींटल 440/- रुपये कमिशन मिळावे.
गहु, तांदुळ, सांखर, डाळ या खादय पदार्थामध्ये प्रती क्वींटल एक किलो घट मिळाली पाहिजे. 4. सर्व राज्यातील दुकानामध्ये खादयतेल, डाळ प्रत्येक महिन्याला उपलब्ध करुन मिळाली पाहिजे. प्रत्येक रास्तभाव दुकानामध्ये एलपीजी गॅस विक्रीसाठी शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. गहु, तांदुळ यांची गोणी 51 किलोची पुर्ण असली पाहिजे व गोणी फाटकी नसावी व प्लॅस्टीक गोणी ऐवजी सुती गोणी देण्यांत यावी. कोरोना काळामध्ये रेशन दुकानदाराने जिवाची पर्वा न करता धान्य वितरीत केले आहे त्या दुकानदारांना कोरोना योध्दा म्हणुन शासनाने घोषित करावा. ग्रामीण भागात जन वितरण प्रणालीची जबाबदारी उपलब्ध गहु आणि तांदुळ खरेदी करुन शासनाने दुकानदारामार्फत खरेदी करावी. रायगड जिल्हयामध्ये नेटचा नेहमी प्रॉब्लेम असतो त्यामुळे 20% ऑफलाईन धान्य वितरीत करण्याची परवानगी मिळावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.