| कर्जत । वार्ताहर ।
युनायटेड वे मुंबईच्या जल संजीवनी प्रकल्प कर्जत अंतर्गत शेतकर्यांसाठी बीज प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक वारे ग्रामपंचायतमधील कुरुंग गावात तसेच अंभेरपाडा ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. समूह संघटक विवेक कोळी यांनी शेतकर्यांना बीजप्रक्रिया उपक्रमाची पार्श्वभूमी सांगितली आणि कृषि तज्ज्ञ जोएब दाऊदी यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगून FIR (Fungicide, Insecticide, Rhizobium) क्रम अर्थातच आधी बुरशीनाशकाची प्रक्रिया त्यानंतर कीडनाशक आणि सगळ्यात शेवटी रायझोबियम कल्चर उपचार करीत स्वतः प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्रक्रिया केलेले बियाणे फक्त आणि फक्त पेरणीसाठी असून लहान मुल, जनावर इ.पासून दूर ठेवावे आणि जास्त काळ तसेच न ठेवता त्वरित सावलीत सुकवून पेरून द्यावे अशा महत्त्वाच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या प्रसंगी प्रदिप क्षीरसागर, मुक्ताजी कांबळे, तुकाराम तिटकारे, केशव धादवड, बळीराम लांघी, रामचंद्र सुपे, पांडुरंग लांघी, मारुती असवले, उमाजी बांबळे, ग्रामसेवक महेन्द्र कुंटे, तानाजी गव्हारी, कांचन भोईर, ज्योती कोशिंबे, सोनी भोईर, राही भोईर, भाऊ कोशिंबे, अशोक भोईर, लक्ष्मण भोईर, चंद्रकांत भालेराव, राकेश पाटील, गजानन भोईर, मदन भालेराव, दिपक भोईर, महेश भोईर यांची उपस्थिती होती. तसेच युनायटेड वे मुंबई-जलसंजीवनी प्रकल्प कर्जतचे कार्यक्षेत्र अधिकारी संतोष काठे, कुंडलिक पादीर आणि अमर पारधी यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.