। सुतारवाडी । वार्ताहर ।
गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने सुतारवाडी, कोलाड, खांब परिसरात ढगांच्या गडगटासह विज चमकत होती आणि संततधारपणे पाऊस पडत असल्यामुळे ज्यांनी भात कापून मळणी रचली आहे अशांच्या मळण्या अक्षरश: भिजल्या आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग आता चिंतेत आहे. भात कापणी झाल्यानंतर काही ठिकाणी वालाची पेरणी करण्यात आली आहे. अशा ठिकाणी पाणी साचून पेरणी केलेले वाल वाया जाणार असल्याची दाट शक्यता आहे. सातत्याने अवकाळी पडणार्या पावसामुळे परिसरातील लाईट सातत्याने ये-जा करत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.