| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जे.एस.एम. महाविद्यालयाममध्ये शनिवारी मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रा. डॉ. आय पी कोकणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉ. मोहसीन खान, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ प्रविण गायकवाड, प्रा. नरेंद्र पाटील, भौतिकशास्त्र शिक्षक श्री अजय सावंत, एन. सी. सी. कॅडेट्स, एन. एस. एस. स्वयंसेवक, आणि 137 विद्यार्थी उपस्थित होते.
जेएसएम अध्यक्ष अॅड. गौतम पाटील व प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी मानवी हक्क दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. कोकणे यांनी आपल्या व्यख्यानात मानवी हक्क दिनाचे महत्व स्पष्ट केले. त्यांनी मानवी हक्क दिन सुरु करणायची पार्श्वभूमी स्पष्ट केली. मानवी जीवन हे सहजीवानातून सुखी होते असे प्रतिपादन डॉ. कोकणे यांनी केले ते पुढे म्हणाले भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला मानवी हक्क बहाल केले आहेत. आपले हक्क अधिकार उपभोगताना इतर व्यक्तीची हक्क व अधिकाराचे उल्लंघन होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन डॉ मोहसीन खान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज मानवी हक्क व अधिकार अबाधित ठेवण्याची गरज आहे. आपले हक्क व अधिकार बजावत असताना इतरांच्या हक्काची पायमल्ली होणार नाही याची प्रत्येकाने दखल घेतली पाहिजे असे डॉ. मोहसीन खान म्हणाले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. नरेंद्र पाटील यांनी केले.