| लंडन | वृत्तसंस्था |
नॉटिंगहॅम मध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांवर संपुष्टात आल्यानंतर भारताने आपल्या दुसर्या डावाला सुरुवात केली आहे. पहिल्या डावात दमदार खेळी करणार्या लोकेश राहुलला स्टुअर्ट ब्रॉडने तंबूचा मार्ग दाखवत इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चौथ्या दिवसअखेर सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा प्रत्येकी 12 धावांवर नाबाद आहेत. भारताने 1 बाद 52 धावा केल्या असून, कसोटीच्या अखेरच्या दिवशी त्यांना विजयासाठी अजून 157 धावांची गरज आहे.
दरम्यान, इंग्लंडचा दुसरा डाव 303 धावांमध्ये गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आलं. कर्णधार जो रुटच्या शतकी (109) खेळीच्या जोरावर इंग्लंडने 303 धावांपर्यंत मजल मारली. चौथ्या दिवसअखेर भारताचा सलामीवीर के.एल. राहुल बाद झाला असून, दिवसअखेर भारताने एक गड्याच्या मोबदल्यात 52 धावा केल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी भारताला 157 धावांची गरज आहे. दुसर्या बाजूला भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावाप्रमाणे दुसर्या डावातही चांगली गोलंदाजी केली. मात्र, त्यांना रुटला लवकर बाद करता आलं नाही. जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्याने पाच विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.