| नवी दिल्ली | वार्ताहर |
विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत 14 सामने खेळले गेले आहेत. तर आज दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात सामना खेळाला जात आहे. आतापर्यंतच्या गुणतालिकेवर नजर टाकली तर भारत अव्वल आहे. त्याने तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत.भारतीय संघाने अशीच कामगिरी कायम ठेवल्यास उपांत्य फेरीचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा होईल. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेनेही उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. भारताने पहिल्या तीन सामन्यात शानदार विजय नोंदवला आहे.
यातील दोन सामने मोठ्या संघांविरुद्ध होते. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गाडी राखून पराभव केला होता. यानंतर अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव झाला. तर अहमदाबादमध्ये पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. सलग तीन सामने जिंकून भारताने उपांत्य फेरीपर्यंतचा दावा मजबूत केला आहे.या विश्वचषकामध्ये बलाढ्य असलेल्या तीन संघांशी भारताचे सामने जून बाकी आहे.गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडने तिन्ही सामने जिंकले आहेत. आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 22 ऑक्टोबरला सामना होणार आहे.यानंतर 29 ऑक्टोबरला भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतचा सामना 5 नोव्हेंबरला होणार आहे. हे तिन्ही सामने भारतासाठी खूप महत्त्वाचे असतील.विश्वचषक स्पर्धेतील सध्याच्या गुणतालिकेत न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 3 सामने खेळले आहेत आणि तिन्ही जिंकले आहेत. न्यूझीलंडचे 6 गुण आहेत. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही मोठ्या फरकाने जिंकले आहेत. त्यामुळे भारताबरोबरच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हेही उपांत्य फेरीचे दावेदार आहेत.