| कर्जत | प्रतिनिधी |
मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून साडेचार महिने आपल्या जीवाची बाजी लावून आंदोलन करणार्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आल्यानंतर कर्जत तालुक्यात जल्लोष करण्यात आला. शहरात वाजत गाजत नाचत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.
मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ सकल मराठा समाजाचे मनोहर थोरवे, राजेश लाड, मधुकर घारे, राम राणे, राजेश जाधव, प्रकाश पालकर, उदय पाटील, अनिल भोसले, पंकज पाटील, रत्नाकर बडेकर, बंडू तुरडे, हरेश घुडे, अभिषेक सुर्वे, ऍड. गोपाळ शेळके, दत्तात्रय पिंपरकर, अनिल मोरे, सोमनाथ पालकर, मधुरा चंदन, उज्वला हजारे, ऍड. पूजा सुर्वे, प्रमिला बोराडे, मारूती बैलमारे, केतन मोधळे, जयदीप शिंदे, केतन मुसळे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोज जारांगे पाटील यांच्या नावाने एकच जल्लोष करण्यात आला.