| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागांसाठी भाजपने रविवारीच उमेदवार जाहीर केले होते. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून संदीप जोशी, संजय किणीकर आणि दादाराव केचे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
येत्या 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी होणार्या निवडणुकीसाठी सहावा अर्ज पुण्यातील उमेश म्हेत्रे यांनी भरला आहे. मात्र, अर्जाबरोबर अनुमोदन आणि सूचक अशा दहा आमदारांच्या सह्या नसल्यामुळे उद्याच्या छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज बाद होईल. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजपा कडून संजय किणीकर (संभाजीनगर), दादाराव केचे (वर्धा), संदीप जोशी (नागपूर), शिवसेना (शिंदे गट) चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) संजय खोडके (अमरावती) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके या विधानसभेत आमदार आहेत.